Tuesday, November 21, 2023

बेफिकीरी नाही बरी!

 "ए आई, आज ना मला सुट्टी आहे. मी जाऊ पियूकडे खेळायला?" संकेत अधीरतेनं म्हणाला.

"अरे थांब जरा, माझं आवरलं की, तुला सोडून येते."

"अगं मी जातो ना एकटाच, इथं जवळच तर आहे पियूचं घर...."

"अरे बाबा, मला माहिती आहे ते, जवळ आहे पण रस्ता ओलांडून जावं लागतं ना.... आणि केवढी रहदारी असते त्या रस्त्यावर!"

"अगं जातो ना मी, तू नकोच काळजी करू... मी व्यवस्थित रस्ता ओलांडतो ना!"

"अरे बाळा, काळजी मी करणार नाही तर कोण करणार? थांब थोडा शांत रहा जरा." आई संकेतला समजावणीच्या सुरात म्हणाली. अशाप्रकारचे प्रसंग आपल्याला नेहमीच घरोघरी बघायला मिळतात.

चिंता करणं किंवा काळजी घेणं हा मनुष्यप्राण्याचा स्वभावधर्म आहे. आईला आपल्या बाळाची काळजी असतेच.. तसेच डॉक्टरला आपल्या रुग्णांची तर शिक्षकांना आपल्या विद्यार्थ्यांची काळजी घ्यावी लागते! बसचालक असो की रेल्वेगाडीचा चालक असो किंवा विमान चालवणाऱ्या पायलटला पण आपल्या प्रवाशांची अगदी डोळ्यात तेल घालून काळजी घ्यावी लागते. नगरसेवकापासून ते मंत्रीपदापर्यंत पोहचलेल्या खासदारांना सुद्धा आपल्या मतदार संघातील मतदारांची काळजी घ्यावी लागते... त्यात त्यांचा स्वार्थ असतो हे सांगायला नकोच! प्राणीसुद्धा याला अपवाद नाही. जगाच्या पाठीवरील कुठल्याही प्राणीमात्राला आपल्या पिल्लांची काळजी असते आणि ते साहजिकच आहे म्हणा! काही व्यक्ती इतक्या संवेदनशील असतात, के व्यक्ती इतक्या संवेदनशील जास्त काळजी असक्तःपेक्षा इतरांचीच स्वतःच्या बाबतीत मात्र कमालीचे बाईक चालवताना बहुतांश अनुभव नक्कीच येत असणार, लोकांना एक असताना आपल्या पक्षका साधु पाईत

वाहतुकीचे नियम पाळणे आणि रस्ता ओलांडतानाही काळजी घेणे आवश्यक आहे! कारण आपल्याप्रमाणेच इतरांनासुद्धा त्यांच्या कुटुंबाची काळजी असते ही जाणीव आपल्याला असायला हवी. काही महाभाग कुणाचाही मुलाहिजा न बाळगता अगदी बेफाम होऊन सुसाट वेगाने गाड्या चालवताना दिसतात. आपल्यामुळे लोकांना काही त्रास होत असणार हे त्यांच्या गावीही नसते. या अशा प्रकारच्या बिलंदरांना दुसऱ्याबद्दल काही सोयरसुतक नसते आणि स्वतःबाबतही हे लोक कमालीचे बेफिकीर असतात. मग एखाद्या दिवशी जीवावर बेतणारा अपघात झाल्यास पश्चाताप करण्याशिवाय ते दुसरं काही करू शकत नाहीत! आजकाल बरेच पालक आपल्या



काढायला चुकून आपण विसरलो तर आपली काळजी घेणारे व आपल्याला तो स्टँड काढायची आठवण करून देणारे अनोळखी हितचिंतक हमखास भेटतात. मला वाटतं, अखिल विश्वात आपली सगळ्यात जास्त काळजी करणारे हेच अनोळखी हितचिंतक असावेत नाही का...! त्यांना असंख्य सलाम!


काही महाविद्यालयीन विद्यार्थी कमालीचे संवेदनशील असतात. परीक्षा जवळ आली की त्यांना खूप टेंशन येत असल्याचं जाणवतं ! मग अभ्यासाच्या काळजीपोटी त्यांच्या प्रकृतीवर विपरित परिणाम होतो. त्यांचा अभ्यास जर वेळेआधी पूर्ण झाला नाही तर ते कुठल्या थराला जाणार याचा काही नेम नसतो. अभ्यास झाला नाही तर त्यांचा भ्रमनिरास होतो. ते खूप लवकर निराश होतात आणि प्रसंगी दुर्दैवाने आत्महत्येच्या आहारी जातात! खरंतर अशा प्रकारच्या विद्याथ्यांना समुपदेशन करणे आवश्यक आहे!


आपण आपल्या कुटुंबाची काळजी घेणं जसं आवश्यक आहे तसंच रस्त्यावर वाहन चालवताना आपल्यापासून इतरांना त्रास होणार नाही याची खबरदारी घेणं सुध्दा अतिशय गरजेचं आहे. त्याचप्रमाणे


मुलांना शाळेत घेऊन जाण्यापासून तर त्याच्या अभ्यासाची नको तितकी काळजी घेताना दिसतात. काही जणांना तर आपल्या मुलांचं अख्खं होमवर्क पूर्ण करण्याची काळजी घेण्यांचं खूप टेंशन असतं. हे जरा अति होतं, नाही का? करू द्या ना... त्यांचा अभ्यास त्यांना, वेळ पडल्यास तुम्ही मार्गदर्शन करू शकताच ना! तशीही आपल्याकडील स्पर्धात्मक शिक्षण पद्धतीमुळे, आजच्या विद्यार्थ्यांना आपल्या अभ्यासाची काळजी घ्यावीच लागते. आईला ज्याप्रमाणे आपल्या मुलांची काळजी असते, त्याप्रमाणे बरेच प्रामाणिक शिक्षक आपल्या विद्यार्थ्यांची काळजी घेताना दिसतात. शेवटी त्यांच्या शाळेचा निकाल तसंच एकंदरीत दर्जा पण त्यांच्यावरच अवलंबून असतो म्हणा..!

      अखिल विश्वाचं कल्याण होण्यासाठी ज्ञानेश्वर माऊलींनी त्या जगन्नियंत्याजवळ पसायदान मागितलं, ते आपल्यासारख्या सामान्य माणसासाठी असलेल्या आत्यंतिक काळजीपोटीच! आपणही आपल्या कुटुंबासाठी, समाजातील दीन दुबळ्यांसाठी, आपल्या देशासाठी काळजी असी जाण नव्हे ते आपलं कर्तव्यच आहे अशी जाण ठेवायला हवी! मग प्रत्येकाचं जगणं सुसह्य झाल्याशिवाय राहणार नाही.

विनोद श्रा. पंचभाई, पुणे 

No comments:

Post a Comment