ठाणे शहर पोलीस विभागातील वरिष्ठ अधिकारी श्री. गजानन राणे सर यांनी माझ्या 'थरार चोवीस तासातला'
या रहस्यमय कादंबरीविषयी थोडक्यात पण अतिशय बोलका अभिप्राय पाठवला आहे. तो इथे शेअर करतो...
लेखक विनोद पंचभाई यांची थरार चोवीस तासातला ही कादंबरी हातात घेतली. सहज दोन तीन पाने वाचल्यानंतर उत्सुकता वाढली आणि मग ती कादंबरी पूर्ण वाचून झाल्यावरच टेबलावर ठेवली. या कादंबरीमधील सस्पेन्स आपल्याला इतका गुंतवून ठेवतो की पुस्तक हातून सुटत नाही. एका बैठकीत वाचल्याशिवाय समाधान मिळत नाही. सतत आता पुढे काय घडणार याची उत्कंठा लागून राहते. या कादंबरीतील पात्रांचे संवाद खूप प्रभावी आहेत. तसेच कथानकही मनावर पकड घेणारे असल्याने कादंबरीची भट्टी छान जमली आहे. त्यामुळे वाचताना कुठेही रटाळवाणे वाटत नाही. एखाद्या सस्पेन्स सिनेमाप्रमाणे शेवटपर्यंत खिळून राहणे काय असते याचा अनुभव थरार कादंबरी वाचताना आला. शेवटी रहस्य उलगडल्यावर आश्चर्याचा धक्का बसल्यावाचून राहत नाही. या कादंबरीचे वैशिष्ट असे की आजच्या तरुण पिढीने कसे सावध राहायला हवे याबाबत या कादंबरीच्या माध्यमातून मोलाचा संदेश दिला आहे.
लेखक विनोद पंचभाई यांचे अभिनंदन करतो आणि त्यांना पुढील कादंबरी लेखनासाठी शुभेच्छा देतो!
... गजानन राणे, पोलीस निरीक्षक, ठाणे शहर
No comments:
Post a Comment