''चक्रव्यूह''
आपण कितीही
सरळ मार्गाने चालत असलो तरी,
घ्यावीच लागतात अचानक
कधीतरी वळणं !
मग----
नको असलेल्या वळणावर
भेटतात नेमकी नको असलेली माणसं!
आणि आयुष्याला लागतं
वेगळंच वळण !
मग बेमालूमपणे जातो आपण
व्यसनांना शरण ! !
आणि होतात तेव्हा ---
परतीचे सगळेच मार्ग बंद!
आपण आपले नसतोच,
नकळत जगणं होतं बेधुंद! !
मग-----
अवस्था होते आपली ,
चक्रव्यूहात अडकलेल्या अभिमन्यूसारखी!
नसतो आपण कुणाचेच,
भासते त्यावेळी सारी दुनियाच पारखी!
मनापासून वाटतं तेव्हा ,
कुठेतरी दिसेल आशेचा किरण!
कधीतरी जगण्याला
लागणार एक नवीन वळण !
---- विनोद श्रा.पंचभाई
छान कविता. आवडली.
ReplyDeleteब्लॉग लेखनाला शुभेच्छा.
धन्यवाद.
DeleteVery nice ... All the best.
ReplyDeleteधन्यवाद..
ReplyDeleteअप्रतिम
ReplyDeleteधन्यवाद!
ReplyDelete