Friday, March 8, 2019

चक्रव्यूह

''चक्रव्यूह''

आपण कितीही
सरळ मार्गाने चालत असलो तरी,
घ्यावीच लागतात अचानक
कधीतरी वळणं !
मग----
नको असलेल्या वळणावर
भेटतात नेमकी नको असलेली माणसं!
आणि आयुष्याला लागतं 
वेगळंच वळण ! 
मग बेमालूमपणे जातो आपण
व्यसनांना शरण ! !

आणि होतात तेव्हा ---
परतीचे सगळेच मार्ग बंद! 
आपण आपले नसतोच, 
नकळत जगणं होतं बेधुंद! !
मग-----
अवस्था होते आपली ,
चक्रव्यूहात अडकलेल्या अभिमन्यूसारखी!
नसतो आपण कुणाचेच, 
भासते त्यावेळी सारी दुनियाच पारखी!

मनापासून वाटतं तेव्हा ,
कुठेतरी दिसेल आशेचा किरण! 
कधीतरी जगण्याला 
लागणार एक नवीन वळण !
                        ---- विनोद श्रा.पंचभाई

6 comments: